खरीप हंगाम 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते व याच कारणाने शासनाच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे. व फेब्रुवारी 2024 मध्ये या अनुदानाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदानाचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे.
मागील खरीप हंगामामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला होता, 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला असल्याने दुष्काळ सुध्दा जाहीर करण्यात आलेला होता, व शासनाच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही, परंतु आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.
ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहे, त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान वितरित केले जाणार आहे, तहसीलदाराच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशा शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी संपूर्ण पंचनामा प्रक्रिया पूर्ण करावा. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याचा तपशील आधार कार्डचा तपशील अशा प्रकारचे तपशील दिलेले नव्हते, अशांचे दुष्काळी अनुदान वितरित करणे बाकी होते, त्यामुळे अशा प्रकारच्या संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना मिळणार नॅनो खतासाठी 50% एवढे अनुदान बघा कोणती आहे ही नविन योजना