देशभरातील मोठ्या संख्येने नागरिक पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवतात तसेच यावर्षी सुद्धा राज्यातील अनेक नागरिकांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ घेत असताना म्हणजेच, नोंदणी करत असताना फक्त एक रुपया द्यावा लागणार आहे, अशा प्रकारची एक रुपयात पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असून आतापर्यंत गेल्यावर्षी व यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया देऊन पिक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे, परंतु यावर्षी अनेक नागरिक म्हणजेच शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित आहे, त्यामुळे त्यांना वाढीव कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे.
खरीप हंगामातील पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 देण्यात आलेली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, तर अनेक शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस पिक विमा योजनेत सहभाग नोंदवण्याची वाढवलेली आहे, व अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता 31 जुलै पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आलेली असून, 31 जुलै 2024 पर्यंत खरीप पिक विमा भरता येणार आहे, त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच वारंवार शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की, एक रुपया देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा.
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे, शेतकरी ज्या ठिकाणी पिक विमा योजनेचा अर्ज करतील त्या ठिकाणी एका पिकासाठी फक्त एकच रुपया द्यावा त्या व्यतिरिक्त एकही रुपया न देता पीक विमा अर्ज करावा परंतु कोणत्या ठिकाणी जर शेतकऱ्याला जास्त पैशाची मागणी केली तर शेतकऱ्यांना तक्रार सुद्धा करता येणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या विविध सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे, व त्यातीलच एक सुवर्णसंधी म्हणजे 31 जुलै 2024 पर्यंत शेतकऱ्यांना खरीप पिक विमा अर्ज करता येईल.
कापूस, सोयाबीन, तूर दराची बाजार समितीतील वाटचाल कशी आहे? काय मिळतोय विविध मालाला दर