देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते, दरवर्षीप्रमाणेच यावर्षी खरीप हंगामातील पीक विमा योजना चालू झालेली असून, खरीप हंगामातील पिकांसाठी नोंदणी प्रक्रिया 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे, योजनेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो शेतकरी अर्ज म्हणजेच नोंदणी करतात पूर्वी मात्र प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत ठराविक रक्कम वेगवेगळ्या पिकानुसार भरावी लागत होती, परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असल्याने आता पैसे भरण्याची गरज उरलेली नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी पिक विमा नोंदणी करता वेळी फक्त एक रुपया द्यावा लागणार आहे, त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक विमा योजनेत नोंदणी केलेली आहे, तसेच दिवसेंदिवस नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसते परंतु आता मात्र 15 जुलै ही खरीप पिक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने या तारखेनंतर पिक विमा योजनेमध्ये नोंदणी करता येणार नाही.
पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या पिकांसाठीचे एक संरक्षण आहे कारण पिकांची नुकसान झाले असतात शेतकऱ्यांना विविध वेळी पीक विम्याची रक्कम दिली जाते, म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला एक प्रकारे संरक्षण पिक विमा योजनेत सहभाग नोंदवल्याने मिळते, पिक विमा भरत असताना 15 जुलै ही शेवटची तारीख असल्याने या दिवशी पीक विमा नोंदणी पोर्टल योग्य चालत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर csc सेंटरवर किंवा इतर ठिकाणी जाऊन फक्त एक रुपया देऊन पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा तसेच यावर्षी खरीप हंगामामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असून अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नसेल अशांनी लवकरच नोंदणी करावी अशे आवाहन करण्यात आलेले आहे.
90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ, अर्ज प्रक्रिया सुरू