अनेक भागांमध्ये सोयाबीनच्या पिकांचा पेरा आहे, सोयाबीन पिके राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते, परंतु सोयाबीन पीक थोड्या प्रमाणात मोठे झालेले असून त्यावर विविध प्रकारच्या पानावर आढळत आहे असा अळ्यांचा बंदोबस्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लावणे गरजेचे आहे, असे न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादनात सुद्धा घट बघायला मिळू शकते, त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांनी अळ्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सोयाबीन पिकाच्या पानावर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याचे कारण म्हणजे, सध्याच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरण असून ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामध्ये सोयाबीनचा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव भासत आहे, त्यामध्ये खोडमाशी चक्रीभुंगा, पाने पोखरणारी अळी यासह इतरही मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे, या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काही पद्धती वापराव्या व त्यामुळे सोयाबीनच्या पानावर असलेल्या कळ्यांचा प्रादुर्भाव कमी करता येईल.
सोयाबीनच्या पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यामुळे सोयाबीनचे पीक चांगल्या प्रमाणात वाढेल व पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होईल, त्यासोबतच रासायनिक खतांचा योग्य व वेळेवर वापर करावा. परंतु नत्र युक्त खतांचा अतिवापर सुद्धा टाळावा. सोयाबीनच्या पिकांमधील तनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यासाठी तणनाशक वापरणे किंवा खुरपणी करावी.
सोयाबीनच्या पिकांमध्ये वीस सापळे प्रती हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांनी लावावे, तंबाखूच्या पानांचे सेवन करणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव असल्यास पाच सापळे लावावे, सोयाबीन या पिकाच्या भोवती एरंडा व सूर्यफूल पिकाचे सापळा एक ओळी लावावी. त्यामुळे विविध प्रकारच्या अळ्या नष्ट होतील तसेच सापळ्यांवर पक्षी बसून अळ्यांचे सेवन करतील म्हणजेच त्या अळ्यांना टिपतील व अशा प्रकारे सोयाबीनच्या पानावर प्रादुर्भाव करणाऱ्या अळ्या कमी होतील.
शेतकऱ्यांना मिळणार नॅनो खतासाठी 50% एवढे अनुदान बघा कोणती आहे ही नविन योजना